विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

आगामी स्पर्धापरीक्षांची तयारी ...

आगामी स्पर्धापरीक्षांची तयारी ...
सरत्या वर्षांच्या अखेरीस आपण कुठला ना कुठला तरी संकल्प धरतो आणि हा संकल्प नवीन वर्षांत पूर्ण कसा करता येईल, याचा विचारही करतो. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी आगामी वर्षांत उत्तम करिअर करू अथवा उत्तम ...नोकरी मिळवू, अशा आशयाचा संकल्प नक्कीच केला असणार. हा संकल्प पूर्ण होण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणेही अत्यावश्यक ठरते.
एखादे ध्येय समोर ठेवून त्या दिशेने वाटचाल व्हायला हवी. या वर्षी आपण ठरवल्यानुसार कितपत पल्ला गाठू शकलो? जे ध्येय ठरवले होते, ते साध्य करण्याच्या दृष्टीने खरोखरीच प्रयत्न केले का, याचे स्वत:च अवलोकन करायला हवे. आपण ठरवलेले ध्येय साध्य करता आले नसेल तरीही खचून जाऊ नका. आगामी वर्षांत भरपूर संधी येणार आहेत, त्यांचा लाभ घ्या आणि आपल्या करिअरची वाटचाल योग्य दिशेने करा. समजा, या वर्षी ध्येय साध्य करण्याच्या प्रयत्नात कसूर केली असेल तर ती चूक नव्या वर्षांत होऊ देऊ नका. स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी तर वर्षभराचे वेळापत्रक आखून अभ्यासाचे नियोजन करा.
स्पर्धापरीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी प्रथम ध्येय निश्चित करा त्या दिशेने प्रयत्नांची सुरुवात केलीत की, आपल्या पंखांना बळ मिळते ते भरारी घेण्यासाठी.
या वर्षांत बँकिंग परीक्षेमध्ये आमूलाग्र बदल झाला. शैक्षणिक पात्रता दहावीऐवजी (६०%) ऐवजी पदवीधर अशी करण्यात आली. संगणकाचेच युग आहे हे निश्चितपणे पक्के झाले. परीक्षापद्धतीही ऑनलाइन झाल्याने, एमपीएससी पूर्वपरीक्षेमध्ये यूपीएससी परीक्षेसारखाच अभ्यासक्रम आणून आयोगाने एक पाऊल पुढेच टाकले आहे.
बँक, रेल्वे, प्रॉव्हिडंट फंड, यूपीएससी, एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे होणाऱ्या भरती तसेच विविध पदांसाठी विविध खात्यांमार्फत निघणारे विविध अर्ज या सर्व बाबींवर लक्ष ठेवून असायला हवे. हे परीक्षेचे अर्ज निघाल्यावर परीक्षेची तयारी करणे हे यश मिळवण्यासाठी पुरेसे नसते.
स्पर्धापरीक्षांचे अर्ज निघण्यापूर्वीच तुम्ही तुमच्या अभ्यासाचा पाया मजबूत करायला हवा आणि त्याचा चांगला परिणाम तुम्ही अनुभवालच.
या येणाऱ्या नवीन वर्षांत कोणकोणत्या नवीन पदांसाठी अर्ज निघणार आहेत याची अंदाजित माहिती या लेखासोबत देत आहोत. त्यामुळे आगामी वर्षांत आपल्याला कोणत्या परीक्षा देता येतील आणि त्याच्या तयारीला प्रारंभ करायला हवा, याचा एक ठोकताळा तुम्हांला मनाशी बांधता येईल आणि ठरविलेले ध्येय साध्य करता येईल.
स्पर्धा परीक्षांची तयारी पुरेशा गांभीर्याने आणि परीक्षापद्धती लक्षात घेऊन केली तर ती योग्य दिशेने सुरू राहते. अभ्यास करताना संबंधित परीक्षा देणाऱ्या इतर परीक्षार्थीशी संपर्कात राहिल्यानेही प्रयत्नांना जोर चढतो आणि अभ्यासविषयक चर्चामधून आपण कितपत पाण्यात आहोत, याचाही अंदाज स्वत:ला येतो.
परीक्षा जवळ आली की, याआधीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा आणि ज्या विषयांमध्ये आपण कमी पडतो, त्याची तयारी अधिक उत्तम रीतीने कशी करता येईल, याकडेही पुरेसे लक्ष द्यायला हवे. याआधीही संबंधित स्पर्धा परीक्षा दिलेल्या आणि त्यात अयशस्वी ठरलेल्या उमेदवारांनी अपयशाची कारणे पडताळून पाहायला हवीत आणि नव्या दमाने स्पर्धापरीक्षेची तयारी करायला हवी.
सोबत दिलेल्या स्पर्धापरीक्षांचे संभाव्य वेळापत्रक लक्षात घेत अभ्यासाची मोट बांधा आणि योग्य दिशेने प्रयत्न करा.. यश तुमचेच आहे.
संस्था/आयोगाचे नाव
*इंटेलिजन्स ब्युरो एसीआयओ परीक्षा अर्जाची मुदत -एप्रिल/मे-२०१३ परीक्षा दिनांक- जाहिरातीनंतर दोन महिन्यांनी
* महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा (पूर्व) परीक्षा, परीक्षा अर्जाची मुदत- साधारणपणे जाने-फेब्रु. र०१३ परीक्षा दिनांक - ७ एप्रिल २०१३
* महाराष्ट्र लोकसेवा आयोग पीएसआय (ढ.र.क.), परीक्षा अर्जाची मुदत- फेब्रु-२०१३ परीक्षा दिनांक- २१.४.२०१३
* महाराष्ट्र लोकसेवा आयोग एसटीआय (र.ळ.क.) मार्च-२०१३ परीक्षा दिनांक- १२.५.२०१३
* महाराष्ट्र लोकसेवा आयोग असिस्टंट (अररळ) एप्रिल-२०१३ परीक्षा दिनांक- १६.६.२०१३
* महाराष्ट्र लोकसेवा आयोग लिपिक टंकलेखक, जुलै-२०१३ परीक्षा दिनांक- १७.११.२०१३
* स्टाफ सिलेक्शन कमिशन कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल-क
(उॅछए) १९.१.२०१३ ते १५.२.२०१३,परीक्षा दिनांक- २१.४.२०१३
* स्टाफ सिलेक्शन कमिशन कम्बाइंड हायर सेकंडरी लेव्हल (उऌछरए) ६.७.२०१३ ते २.८.२०१३ २०.१०.२०१३ आणि २७.१०.२०१३ आणि ३.११.२०१३
* स्टाफ सिलेक्शन कमिशन मल्टिटास्किंगस्टाफ (टळर) ७.९.२०१३ ते ४.१०.२०१३ २२.१२.२०१३ आणि २९.१२.२०१३ आणि ५.०१.२०१३
* आयबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसर साधारणपणे जाने. फेब्रु-२०१३, ऑक्टोबर २०१३ परीक्षा दिनांक- जाहिरातीनंतर दोन महिन्यांनी
* आयबीपीएस क्लार्क साधारणपणे एप्रिल - मे २०१३ परीक्षा दिनांक- जाहिरातीनंतर दोन महिन्यांनी
* आयबीपीएस रिजनल रुरल बँक साधारणपणे एप्रिल - मे २०१३ परीक्षा दिनांक- जाहिरातीनंतर दोन महिन्यांनी
* एसबीआय क्लार्क साधारणपणे फेब्रु- मार्च २०१३ परीक्षा दिनांक- जाहिरातीनंतर दोन महिन्यांनी
* एसबीआय ऑफिसर मार्च - एप्रिल २०१३ परीक्षा दिनांक- जाहिरातीनंतर दोन महिन्यांनी

By :- प्रा. संजय मोरे.

Photo: आगामी स्पर्धापरीक्षांची तयारी ...

सरत्या वर्षांच्या अखेरीस आपण कुठला ना कुठला तरी संकल्प धरतो आणि हा संकल्प नवीन वर्षांत पूर्ण कसा करता येईल, याचा विचारही करतो. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी आगामी वर्षांत उत्तम करिअर करू अथवा उत्तम नोकरी मिळवू, अशा आशयाचा संकल्प नक्कीच केला असणार. हा संकल्प पूर्ण होण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणेही अत्यावश्यक ठरते.
एखादे ध्येय समोर ठेवून त्या दिशेने वाटचाल व्हायला हवी. या वर्षी आपण ठरवल्यानुसार कितपत पल्ला गाठू शकलो? जे ध्येय ठरवले होते, ते साध्य करण्याच्या दृष्टीने खरोखरीच प्रयत्न केले का, याचे स्वत:च अवलोकन करायला हवे. आपण ठरवलेले ध्येय साध्य करता आले नसेल तरीही खचून जाऊ नका. आगामी वर्षांत भरपूर संधी येणार आहेत, त्यांचा लाभ घ्या आणि आपल्या करिअरची वाटचाल योग्य दिशेने करा. समजा, या वर्षी ध्येय साध्य करण्याच्या प्रयत्नात कसूर केली असेल तर ती चूक नव्या वर्षांत होऊ देऊ नका. स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी तर वर्षभराचे वेळापत्रक आखून  अभ्यासाचे नियोजन करा. 
स्पर्धापरीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी प्रथम ध्येय निश्चित करा त्या दिशेने प्रयत्नांची सुरुवात केलीत की, आपल्या पंखांना बळ मिळते ते भरारी घेण्यासाठी.
या वर्षांत बँकिंग परीक्षेमध्ये आमूलाग्र बदल झाला. शैक्षणिक पात्रता दहावीऐवजी (६०%) ऐवजी पदवीधर अशी करण्यात आली. संगणकाचेच युग आहे हे निश्चितपणे पक्के झाले. परीक्षापद्धतीही ऑनलाइन झाल्याने, एमपीएससी पूर्वपरीक्षेमध्ये यूपीएससी परीक्षेसारखाच अभ्यासक्रम आणून आयोगाने एक पाऊल पुढेच टाकले आहे.
बँक, रेल्वे, प्रॉव्हिडंट फंड, यूपीएससी, एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे होणाऱ्या भरती तसेच विविध पदांसाठी विविध खात्यांमार्फत निघणारे विविध अर्ज या सर्व बाबींवर लक्ष ठेवून असायला हवे. हे परीक्षेचे अर्ज निघाल्यावर परीक्षेची तयारी करणे हे यश मिळवण्यासाठी पुरेसे नसते.
स्पर्धापरीक्षांचे अर्ज निघण्यापूर्वीच तुम्ही तुमच्या अभ्यासाचा पाया मजबूत करायला हवा आणि त्याचा चांगला परिणाम तुम्ही अनुभवालच. 
या येणाऱ्या नवीन वर्षांत कोणकोणत्या नवीन पदांसाठी अर्ज निघणार आहेत याची अंदाजित माहिती या लेखासोबत देत आहोत. त्यामुळे आगामी वर्षांत आपल्याला कोणत्या परीक्षा देता येतील आणि त्याच्या तयारीला प्रारंभ करायला हवा, याचा एक ठोकताळा तुम्हांला मनाशी बांधता येईल आणि ठरविलेले ध्येय साध्य करता येईल.
स्पर्धा परीक्षांची तयारी पुरेशा गांभीर्याने आणि परीक्षापद्धती लक्षात घेऊन केली तर ती योग्य दिशेने सुरू राहते. अभ्यास करताना संबंधित परीक्षा  देणाऱ्या इतर परीक्षार्थीशी संपर्कात राहिल्यानेही प्रयत्नांना जोर चढतो आणि अभ्यासविषयक चर्चामधून आपण कितपत पाण्यात आहोत, याचाही अंदाज स्वत:ला येतो. 
परीक्षा जवळ आली की, याआधीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा आणि ज्या विषयांमध्ये आपण कमी पडतो, त्याची तयारी अधिक उत्तम रीतीने कशी करता येईल, याकडेही पुरेसे लक्ष द्यायला हवे. याआधीही संबंधित स्पर्धा परीक्षा दिलेल्या  आणि त्यात अयशस्वी ठरलेल्या उमेदवारांनी अपयशाची कारणे पडताळून पाहायला हवीत आणि नव्या दमाने स्पर्धापरीक्षेची तयारी करायला हवी. 
सोबत दिलेल्या स्पर्धापरीक्षांचे संभाव्य वेळापत्रक लक्षात घेत अभ्यासाची मोट बांधा आणि योग्य दिशेने प्रयत्न करा.. यश तुमचेच आहे.
संस्था/आयोगाचे नाव                  
*इंटेलिजन्स ब्युरो  एसीआयओ    परीक्षा  अर्जाची मुदत   -एप्रिल/मे-२०१३        परीक्षा दिनांक-  जाहिरातीनंतर दोन महिन्यांनी                                                                                
* महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा (पूर्व) परीक्षा, परीक्षा  अर्जाची मुदत- साधारणपणे जाने-फेब्रु. र०१३   परीक्षा दिनांक -  ७ एप्रिल २०१३ 
* महाराष्ट्र लोकसेवा आयोग  पीएसआय (ढ.र.क.), परीक्षा  अर्जाची मुदत- फेब्रु-२०१३  परीक्षा दिनांक- २१.४.२०१३ 
* महाराष्ट्र लोकसेवा आयोग  एसटीआय (र.ळ.क.)  मार्च-२०१३ परीक्षा दिनांक-  १२.५.२०१३ 
* महाराष्ट्र लोकसेवा आयोग  असिस्टंट (अररळ)  एप्रिल-२०१३ परीक्षा दिनांक-   १६.६.२०१३ 
* महाराष्ट्र लोकसेवा आयोग  लिपिक टंकलेखक, जुलै-२०१३  परीक्षा दिनांक- १७.११.२०१३
* स्टाफ सिलेक्शन कमिशन  कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल-क  
(उॅछए)  १९.१.२०१३ ते १५.२.२०१३,परीक्षा दिनांक- २१.४.२०१३ 
* स्टाफ सिलेक्शन कमिशन  कम्बाइंड हायर सेकंडरी लेव्हल (उऌछरए)  ६.७.२०१३ ते २.८.२०१३  २०.१०.२०१३ आणि २७.१०.२०१३ आणि ३.११.२०१३ 
* स्टाफ सिलेक्शन कमिशन  मल्टिटास्किंगस्टाफ (टळर)  ७.९.२०१३ ते ४.१०.२०१३  २२.१२.२०१३ आणि २९.१२.२०१३ आणि ५.०१.२०१३ 
* आयबीपीएस  प्रोबेशनरी ऑफिसर  साधारणपणे जाने. फेब्रु-२०१३, ऑक्टोबर २०१३  परीक्षा दिनांक- जाहिरातीनंतर दोन महिन्यांनी 
* आयबीपीएस  क्लार्क  साधारणपणे एप्रिल - मे २०१३  परीक्षा दिनांक- जाहिरातीनंतर दोन महिन्यांनी 
* आयबीपीएस  रिजनल रुरल बँक  साधारणपणे एप्रिल - मे २०१३ परीक्षा दिनांक- जाहिरातीनंतर दोन महिन्यांनी 
* एसबीआय  क्लार्क  साधारणपणे फेब्रु- मार्च २०१३ परीक्षा दिनांक- जाहिरातीनंतर दोन महिन्यांनी 
* एसबीआय  ऑफिसर  मार्च - एप्रिल २०१३ परीक्षा दिनांक- जाहिरातीनंतर दोन महिन्यांनी

By :- प्रा. संजय मोरे.

सामान्य ज्ञान (४)

PART - A

* श्रीलंकेत वर्षभर पाऊस पडतो.

* नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे.

* जगात ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे.

* येशू ख्रिस्ताची जन्मभूमी बेथलहेम पॅलेस्टाईन देशात आहे.

* जेरुसलेम हे पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे.

* अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला.

* फिनलंड जगातील सर्वात जास्त सरोवरे असलेला देश.

* व्हॅटीकन सिटी सर्वात कमी प्रादेशिक क्षेत्र असलेले राष्ट्र.

* बर्मुडा ट्रँगल हे उत्तर अलटान्टिक महासागरातील भौगोलिक ठिकाण.

* इंग्लंडमध्ये जगातील पहिला तुरुंग (जेल) स्थापन केला.

* लंडनमध्ये सर्वात पहिली भुयारी रेल्वे सुरू.

* नॉर्वे हा जगातील सर्वाधिक कर असलेला देश.

* चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश.

* स्वित्र्झलड हा जगातील सर्वात कमी बेकारी असणारा देश.

* केनिया हा जगातील सर्वाधिक जन्मदर असलेला देश.

* जपान भारताकडून लोह खनिज आयात करतो.

* रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे जगात सर्वाधिक लांबीची समजली जाते.

* नॉर्वे देशाला मध्यरात्रीचा सूर्य दिसतो.

PART - B

* चीनमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या प्रचंड वादळांना टायफून म्हणतात.

* स्वीडन हा जगातील सर्वात जुने वृत्तपत्र अस्तित्वात असलेला देश.

* दमास्कस जगातील सर्वात प्राचीन शहर.

* टोकियो जगातील सर्वाधिक महागडे शहर.

* नेदरलँडमध्ये जगातील सर्वात जुना वायदेबाजार आहे.

* तुर्की देशाचे चलन सर्वप्रथम सुरू झालेला देश.

* हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला.

* अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस या नावाने ओळखतात.

* अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मेडल ऑफ फ्रीडम आहे.

* लंडनला लोकशाही संसदीय पद्धतीचा जनक म्हणतात.

* दक्षिण अमेरिकेतील निकाराग्वाने पूर्ण साक्षरतेचा टप्पा गाठला.

* मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण आढळला.

* दुबईतील बुर्ज दुबई या इमारतीला जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब मिळाला.

* फिलिपाईन्सची मारिया कॉरिझॉन अकिनो ही आशियातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे. नुकतेच कर्करोगाने निधन)

PART - C

* बिजिंग (चीन) येथे जगातील सर्वात मोठे मत्स्यालय आहे.

* शिकागो येथे जगातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे.

* फिलिपाईन्स देशाकडून रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येतो.

* ल्हासा (तिबेट) जगातील सर्वात जास्त उंचीवरील विमानतळ. येथे बुद्धधर्मियांचे पवित्र र्थक्षेत्र. दलाई लामांचा प्रसिद्ध राजवाडा येथे आहे.

* बंकिंगहॅम पॅलेस इंग्लंडच्या राणीचे राहण्याचे ठिकाण.

* मक्का (सौदी अरेबिया) मुस्लीम धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र, मक्केच्या यात्रेवरून परत लेल्यांना हाजी ही उपाधी दिली जाते.

* पॅरिस येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे.

* लंडन पोलिसांचे केंद्र कार्यालय स्कॉटलंड यार्ड या नावाने प्रसिद्ध आहे.

* चीन हा लष्करी शिक्षण सक्तीचे असलेला आशियाई देश आहे.

* बोट्सवाना हा जगातील स्वत:चे लष्कर नसलेला देश आहे.

* ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठी हिमनदी आहे.

* अॅमेझॉन नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी आहे.

* इटलीमध्ये जगातील सर्वात लहान नाव असलेली डी नदी आहे.

* चीनचे दु:खाश्रू हो-हॅग-हो नदीस म्हणतात.

* इंडोनेशिया जगातील ज्वालामुखींची सर्वात जास्त संख्या असलेला देश आहे.

* जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात.

विशेष ज्ञान (८)

PART - 1

शेरवली – महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे रत्नागिरीतील जन्मगाव.

श्रीनगर – जम्मू-काश्मिरची राजधानी.

श्वास – भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट.

संताजी जगनाडे – संत तुकारामांचे अभग लिहिण्याचे काम त्यांच्या या मित्राने केले.

संथाल – हि सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदीवासी जमात आहे.

संबोधन – व्याकरणातील आठवी विभक्ती.

संस्कृत – पंचतंत्र कथा सुरुवातीला या भाषेत लिहील्या गेल्या.

सईदा अनवरा – आसामच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.

सज्जनगड – समर्थ रामदासांची समाधीस्थळ.

सतलज नदी – पंजाबमधील सर्वात मोठी नदी.

सत्ययुग – चार युगांपैकी पहिले युग.

सत्ययुग – हिदु पुराणानुसार रामाचा जन्म या युगात झाला.

सदरक्षणाय खलनिग्रनाय – महाराष्ट्र पोलिसांचे ध्येयवचन.

सम्राट अशोक – ‘ देवनाम् प्रिय, प्रियदर्शनी ‘ असे वर्णन करण्यात आलेला भारतीय सम्राट.

सरोजिनी नायडू – भारतातील पहिली महिला राज्यपाल.

सहा – वाळवीच्या पायांची संख्या.

सहारा – जगातिल सर्वात मोठे वाळवंट.

सह्याद्री – महाराष्ट्रातील पश्चिम घाट.

सांदिपनी – श्रीकृष्णाचा गुरु.

PART - 2

शहाजहान – दिल्लीचा लाल किल्ला याने बांधला.

शहामृग – सर्वात जलद धावणारा पक्षी.

शहामृग – हा पक्षी उडू शकत नाही.

शांगहाई – चीनमधील सर्वात मोठे शहर.

शांतिवन – पंडीत नेहरु यांचे समाधीस्थळ.

शारदासदन – ११ मार्च १८८९ रोजी पं. रमाबाईनी मुंबईत बालविधवांसाठी सुरु केलेली संस्था.

शाल्की – भारतीय बनावटीची पहिली पानबुडी.

शिकंदर – एका जगज्जेत्या ग्रीक राजाचे नाव.

शिमला – हिमाचल प्रदेशची राजधानी.

शिरपूर – आंतरराष्ट्रीय दर्जाचा सोने शुद्ध करण्याचा भारतातील पहिलाच प्रकल्प (जि.धुळे)

शिलिंग - टांझानिया देशाचे चलन.

शिलॉंग – मेघालयची राजधानी.

शिवनेरी – छ. शिवाजी महारांजांचे जन्मस्थळ.

शिवसमुद्रम – भारतातील पहिले जलविद्युत केंद्र.

शिवाजी सागर – कोयना धरणाचे जलाशय.

शीख – गुरु नानकांनी स्थापण केलेला धर्म.

शुक्र – पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह.

शुक्र – या ग्रहाचा व्यास जवळपास पृथ्वी एवढा आहे.

शुक्र – हा असा एकमेव ग्रह आहे कि जो पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वतःभोलती फिरतो.

शेकरु – महाराष्ट्राचा राज्यप्राणी.

विशेष ज्ञान (७)

PART - 1

वाघ – भारताचा राष्ट्रीय प्राणी.

वाघ – भारताचा राष्ट्रीय प्राणी.

वायव्य – महाराष्ट्र राज्याच्या नकाशात नंदुरबार जिल्हा या दिशेला येतो.

वाल्मीक – रामायण या संस्कृत महाकाव्याचा जनक.

वाळू – काच बनविण्यासाठी आवश्यक असणारा घटक.

वासंती – मराठी चित्रपटातील पहिली बालनटी.

विंटहूक – नामिबिया देशाची राजधानी.

विकीलीक्स – संवेदनशील परंतु अधिकृत माहिती प्रसिद्ध करत वादग्रस्त ठरलेली ज्युलियन असांज यांची वेबसाईट.

विक्रम साराभाई – भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार.

विक्रांत – भारताच्या पहिल्या विमानवाहू नौकेचे नाव.

विजयघाट – लालबहादुरशास्त्री यांचे समाधीस्थळ.

विजापुर – गोल घुमट या शहरात आहे.

वितल – सप्तपाताळांपैकी दुसरे.

विद्युतघट – रासायनिक शक्तीचे विद्युतशक्तीत किंवा विद्युत शक्तीचे रासायनिक शक्तीत रुपांतर करणारे साधन.

विनोबा भावे – गितीई या ग्रंथाचे लेखक.

विनोबा भावे – पहिले वयक्तिक सत्याग्रही.

विराट – भारताची पहिली विमानवाहू नौका.

विल्यम बॅफिन – रेखांशाची गणना करणारा पहिला दर्यावर्दी.

विल्यम वॉर्ड – बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना याची होती.

विवेकसिंधु – मराठी वाङ्मयातील पहिला ग्रंथ.

विशाखा – कवी कुसूमाग्रज यांचा पहिला काव्यसंग्रह.

PART - 2 

विशाखापट्टणम – भारतातील पहिले जहाजबांधणी केंद्रस्थळ.

विशालगड – इतिहास कालीन पावनखिंड या गडाजवळ आहे.

विश्वकर्मा – देवांचा शिल्पकार, ब्रम्हदेवाचा पुत्र.

.विश्वामित्र – श्रीरामाचा प्रचंड धनुष्यबाण याने बनविला होता.

विश्वास पाटील – पानिपत, संभाजी आदी कादंबरींचे लेखक.

विषुवदिन – रात्र १२ तासांची व दिवस १२ तासांचा असतो तो दिवस.

विष्णुदास भावे – सीतास्वयंवर या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग यांनी घडवून आणला.

विसोबा खेचर – संत नामदेव यांचे गुरु.

वीरभुमी – राजीव गांधी यांची समाधी येथे आहे.

वुलर – भारतातील सर्वात मोठे सरोवर.

वॅटीकन सीटी – जगातील सर्वात लहान देश.

वेणाबाई – ‘ सीता स्वयंवर ‘ हे लोकप्रिय काव्य रचणारी रामदासांची शिष्या.

वैकुंठ – विष्णुचे निवासस्थान येथे आहे असे माणले जाते.

वॉन – दक्षिण कोरियाचे चलन.

वॉरन हेस्टिंग्ज – बोर्ड ऑफ रेव्हेनू, मुलकी आणी फौजदारी न्यायालयाचा संस्थापक.

व्योमेशचंद्र बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष.

व्हाईट हाऊस – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान.

शनी – कडी असलेला ग्रह.

शबरी –श्रीरामाला उष्टी बोरे खाऊ घालणारी भिल्लीन.

शरावती – जोग धबधबा या नदीवर आहे.

शशिकला काकोदकर – गोव्याच्या पहिली महिला मुख्यमंत्री.

विशेष ज्ञान (६)

Part 1
रोम – सात टेकड्यांचे शहर.

लंडन – इंग्लंड ची राजधानी.

लंडन – पहिली भुयारी रेल्वे या शहरात सुरु झाली.

लंडन – सर्वात पहिली भुयारी रेल्वे या शहरात सुरु झाली.

लक्ष्मण – रामाचा सावत्र भाऊ.

लक्ष्य – भारताचे पहिले चालकविरहीत विमान.

लखनऊ – उत्तर प्रदेशची राजधानी.

लागोस – नायजीरियातील सर्वात मोठे शहर.

लामा – तिबेटमधिल बौद्धभिक्षू.

लाला लजपतराय – अन् हॅपी इंडीया या पुस्तकाचे लेखक.

लिटल बॉय – अमेरिकेने १९४५ रोजी हिरोशिमा या शहरावर (जपान) टाकलेल्या अणुबॉम्बचे नाव.

लिट्टे – राजीव गांधींची हत्या बॉंम्बस्पोटात घडवून आणनारी संघटना.

लिरा – इटलीचे चलन.

लिरो – टर्की(तुर्कस्थान) चे चलन.

लिस्बन – पोर्तुगालची राजधानी.

लीफ एरिकसन – याने ग्रीनलंड मध्ये सर्वप्रथम युरोपियन वसाहत स्थापन केली.

लीलावती – गणितज्ञ भास्कराचार्यांचा गणितशास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ.

लीळा चरित्र - मराठी वाङ्मयातील पहिला गद्य चरित्र ग्रंथ.

लुई पाश्चर – रॅबीजच्या जंतूंचा शोध याने लावला.

Part 2
लुईस ब्राउन – पहिली टेस्टट्युब बेबी.

लू – उत्तर भारतात उन्हाळ्यात वाहणारे अतिउष्ण वारे.

लॅक्टोज – या घटक द्रव्यामुळे दुध गोड लागते.

लेनिन – रशियन क्रांतीचा जनक.

लेनिन – रशियन क्रांतीचा शिल्पकार.

लॉर्ड एल्फिन्स्टन – मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर.

लॉर्ड कर्झन – पोलीस कमिशनची स्थापना याने केली.

लॉर्ड कॅनिंग – हे भारताचे पहिले व्हॉईसरॉय होते.

लॉर्ड डलहौसी – भारतात रुपयाची सुरुवात याने केली.

लॉर्ड बेटिंग – सतीच्या चालीवर याने बंदी आणली.

लॉर्ड मेकॉले – याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला.

लॉर्ड रिपन – स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक.

लॉर्ड्स – क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूचा सर्वात प्रथम वापर होणारे मैदान.

लॉस एंजेल्स – कॅलिफोर्नियातील सर्वात मोठे शहर.

लोकमान्य टिळक – भारतीय असंतोषाचे जनक.

ल्हासा – जगातील सर्वाधिक उंचीवरील विमानतळ.

वडोदरा – गुजरातमधील या शहरास सयाजी नगरी या नावानेही ओळखले जाते.

वर्धा – महाराष्ट्रात .. येथे हत्तीरोग संशोधन केंद्र कार्यरत आहे.

वर्धा – महाराष्ट्रात संपुर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा.

वसुंधरा राजे – राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.

२९ डिसेंबर दिनविशेष

ठळक घटना
१९८५ : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कार्यान्वित झाली.
१९८८ : इस्लामाबाद येथे ४ थी सार्क परिषद सुरु झाली.
१९६५ : मद्रास आवडी या गावी भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा तयार करण्यात आला.
१८९१ : थॉमस अल्वा एडिसनने रेडियोसाठी पेटंट मिळविला.

जन्म
१९०० : दिनानाथ मंगेशकर यांचा जन्म झाला.
१८०० : व्हल्कनायझेशन शोधणारे चार्लस गुडईयर यांचा जन्म झाला.
१८४४ : उमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा पहिला अध्यक्ष, वकील.
१९१७ : रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक.
१९४२ : राजेश खन्ना भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते.

मृत्यू
१९६७ : पंडित ओंकारनाथ ठाकूर, भारतीय गायक, संगीतज्ञ.
१९७१ : दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी.

महाराष्ट्र : सर्वसामान्य माहिती



क्षेत्रफळ : 307,713 km2 (भारतात तिसरा क्रमांक )
लोकसंख्या: (२००१ ची जनगणना )
96,752,247 (भारतात २ रे )
(२०११ ची जनगणना :हंगामी आकड्यांनुसार ) :
112,372,972 (भारतात २ रे )



राज्याचे गीत: "जय जय महाराष्ट्र माझा "

राजभाषा: मराठी

राज्याचा प्राणी (State Animal): शेकरू ( मोठी खार: भीमाशंकरच्या जंगलात आढळते.)

राज्य वृक्ष: आंबा
राज्य पक्षी: हरीयाल(हिरव्या रंगाचा कबुतरासारखा दिसणारा पक्षी )

राज्याचा खेळ : कब्बड्डी

राज्य नृत्य : लावणी








महाराष्ट्र नावाचा उगम

महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाउ लागले असे ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महाररट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.[२]

इतिहास

या विषयाचा विस्तृत लेख पहा - महाराष्ट्राचा इतिहास
अजिंठ्यातील लेणी
महाराष्ट्रातील विविध स्थळांचा - नदी,पर्वत,स्थळ इ.- रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. व्यवस्थित माहितीची उपलब्ध ऐतिहासिक साधने इ.स.पूर्व तिसर्‍या शतकापासून महाराष्ट्राची माहिती देतात.
महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक,पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्लिश लोक, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.

मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य

महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात ३र्‍या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. मगध, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते,परंतु सातवाहन राजा शालिवाहन आणि देवगीरीचे यादव यांच्या कालखंडातमराठी भाषा-संस्कृतीचा विकास झाला. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी इ.स.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ मध्ये महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शातकारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू केलेला शालिवाहन शक आजही रूढ आहे.
त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा दिल्लीचे अलाउद्दीन खिलजी व नंतर मुहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स. १३४७ मध्ये तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले.

मराठा व पेशवे

छत्रपती शिवाजी महाराज
१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले. इ.स. १६७४ मधील राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची 'अधिकृत' सुरुवात झाली.
शिवाजीराजांचे पुत्र संभाजीराजे भोसल्यांना मोगल बादशहा औरंगझेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हातात पडले. भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले. बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव पहिले यांनी मराठा राज्य वाढवले व सध्याच्या भारताच्याही सीमेपार आपली वर्चस्व प्रस्थापित केले.
इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसर्‍या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व महराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतली.

ब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स. १७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युद्धे झाली. इ.स.१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले.
महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते. मराठवाडानिजामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती

हुतात्मा स्मारक,मुंबई
या विषयावरील विस्तृत लेख पहा - संयुक्त महाराष्ट्र चळवळ
ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.
अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.

भौगोलिक स्थान

महाराष्ट्रातील पर्वत
कोकण
महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वादख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशासह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणिकृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.

प्रशासन

मंत्रालय:महाराष्ट्र राज्य
भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, राज्यपाल राज्याचा प्रमुख व्यक्ती असते. राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. राज्याचे शासनमुख्यमंत्री, चालवतात. या व्यक्तीकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात.महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी मुंबई येथे आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. मुंबई उच्च न्यायालय याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते.
महाराष्ट्रात दोन विधान-सदने (bicamel) आहेत. विधान सभेत लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरीत्या नियुक्त प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे संसदेत ६७ प्रतिनिधी असतात, पैकी राज्यसभेत १९ प्रतिनिधी तर लोकसभेत ४८ प्रतिनिधी असतात.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील राज्य मुख्यत: कॉँग्रेस पक्षाकडे आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार या काही महत्त्वाच्या कॉंग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे. १९९५ साली शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली. कॉँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला. सध्या (इ.स. २०११)महाराष्ट्रात कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीची सत्ता असून पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री तर अजित पवार हे उप-मुख्यमंत्री आहेत.

विभाग

महाराष्ट्र राज्याचे विभाग
या विषयाचा विस्तृत लेख महाराष्ट्रातील जिल्हे
महाराष्ट्र राज्य ३५ जिल्ह्यांत विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा महसुली विभाग आहेत- पुणे , नाशिक , औरंगाबाद , कोकण , नागपूरअमरावती . हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत.
भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: देश किंवा पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग), उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग) , आणि कोकण (कोकण विभाग).

अर्थव्यवस्था

मुंबई शेअर बाजार
राज्याचे वार्षिक उत्पन्न पुढील तक्त्यात दिले आहे. स्रोत सांख्यिकी मंत्रालय,भारत सरकार (आकडे- कोटी रु.)
वर्ष वार्षिक उत्पन्न
१९८० १६,६३१
१९८५ २९,६१६
१९९० ६४,४३३
१९९५ १,५७,८१८
२००० २,३८,६७२
सन १९७० नंतरच्या दशकातील योग्य आर्थिक धोरणांमुळे महाराष्ट्र राज्य भारतातील अग्रगण्य औद्योगिक राज्य बनले.आर्थिक क्षेत्रात पहिला क्रमांक मिळविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आणि प्रगतिशील, पुरोगामी अशा राज्यांपैकी ते एक आहे. परंतु महाराष्ट्रात विकास सारख्या प्रमाणात होऊ शकला नाही. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण विदर्भ, मराठवाडा व कोकण हे भाग मागास राहिले. महाराष्ट्रातील राजकारणात व नोकरशाहीतही पश्चिम महाराष्ट्राचा अधिक प्रभाव आहे[ संदर्भ हवा ].
राज्याचे २००४ सालचे वार्षिक उत्पन्न (gross state domestic product) १०६ अब्ज अमेरिकन डॉलर इतके आहे. महाराष्ट्र भारतातील दुसरे सर्वांत जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे.
एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३% महाराष्ट्राचे योगदान आहे. ६४.१४% लोक कृषी व संबंधित उद्योगात रोजगार मिळवतात. एकूण वार्षिक उत्पन्नापैकी (GSDP) ४६% हिस्सा हा कृषी व संबंधित उद्योगातून मिळतो.
  • महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंदे - रासायनिक आणि संबंधित उत्पादने, विद्युत आणि साधी यंत्रे, कापड, पेट्रोलीयम आणि तत्सम उद्योग हे आहेत.
  • इतर महत्त्वाचे उद्योगधंदे - धातू उत्पादने, वाईन द्राक्षापासून तयार केले जाणारे मद्य), दागिने, औषधे, अभियांत्रिकी सामान, यांत्रिक सामान, पोलाद व लोह उद्योग, प्लास्टिक वायर्स.
  • महत्त्वाची पिके- आंबा, द्राक्षे, केळी, संत्री, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि कडधान्ये.
  • महत्त्वाची नगदी पिके (cash crops)- शेंगदाणे, कापूस, ऊस, हळकुंड व तंबाखू.
सिंचीत जमीन ३३,५०० कि.मी इतकी आहे.
मुंबई, महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जवळजवळ सर्व प्रमुख बँका, आर्थिक संस्था, विमा संस्था व गुंतवणूक संस्थांची मुख्य कार्यालये येथे आहेत. भारतातील चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे पहिल्या क्रमांकाचे निर्मिती केंद्र मुंबई आहे. मुंबई शेअर बाजार (भारतातील सर्वांत मोठा व आशियातील सर्वांत जुना) ही महत्त्वाची संस्था मुंबईत आहे. महाराष्ट्र सरकारने सॉफ्टवेर पार्क्स पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, आणि औरंगाबाद येथे स्थापन केली आहेत.
कोळसानिर्मित व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. जट्रोफा लागवडीसाठी महाराष्ट्राने नवा प्रयोग सुरू केला आहे. ४१% पेक्षा जास्त S&P CNX 500 कंपन्यांची महाराष्ट्रात कार्यालये आहेत.

लोकजीवन

महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारतातील दुसर्या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणार्यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३७० कि.मी. इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.८३ कोटी पुरुष व ५.४० कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९४६ महिला इतका आहे. ८२.९% लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता.
मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्याचबरोबर हिंदी भाषाइंग्लिश शहरी भागात बोलली जाते. उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात अहिराणी बोलीभाषा तर दक्षिण कोकणात मालवणी या मराठीच्या बोलीभाषा बोलल्या जातात. दख्खनच्या देश भागात 'देशी' व विदर्भात 'व-हाडी' या बोलीभाषा अस्तित्वात आहेत.
राज्यात ८०.२% हिंदू, १०.६% मुस्लिम, ६% बौद्ध, १.३% जैन व १% ख्रिश्चन धर्मीय जनता आहे. काही प्रमाणार ज्यूपारशी धर्मीय देखील आहेत.

संस्कृती

जेजुरी देवस्थान, पुणे जिल्हा
महाराष्ट्रातील काही मंदीरे अनेक शतकांपासूनची आहेत. मंदीरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारताचा मिलाप आढळतो. मंदीरांवर हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा आहे. औरंगाबाद जवळील अजिंठा व वेरुळची लेणी जगप्रसिद्ध आहेत. मोगल शिल्पशैलीची झलक औरंगाबाद येथीलच बीबी का मकबरा येथे पहायला मिळते. महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत. रायगड, प्रतापगडसिंधुदुर्गही काही उदाहरणे.
महाराष्ट्राचे लोकसंगीत समृद्ध आहे. गोंधळ, लावणी, भारुड http://santeknath.org/nivadak%20vagamay.html आणि पोवाडा हे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. मराठी साहित्य भारतातील अग्रगण्य असे असून ज्ञानेश्वर (भावार्थदीपिका अर्थात 'ज्ञानेश्वरी'चे रचयिते), सन्त एकनाथ, पु.ल. देशपांडे, प्र.के.अत्रे, व्यंकटेश माडगूळकर हे काही प्रमुख लेखक व कवी आहेत. प्रत्येक वर्षी अनेक मराठी पुस्तके प्रकाशित होत असतात. मराठी नाटक, चित्रपट व दूरचित्रवाणीचे केंद्र मुंबई येथे आहे आणि बहुतेक कलाकार सर्व माध्यमातून कामे करतात. मराठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध व्यक्ति - पु.ल.देशपांडे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे आणि व्ही. शांताराम. मराठी नाटकांचा जुना काळ हा कोल्हटकर, खाडिलकर, देवल, गडकरी व किर्लोस्कर आदी लेखकांनी गाजवला. तो काळ संगीतनाटके आणि नाट्यसंगीताचा होता. याच काळात बालगंधर्व, केशवराव भोसले, भाऊराव कोल्हटकर व दीनानाथ मंगेशकर या गायक-कलावंतानी रंगभूमीची सेवा केली.
त्र्यंबकेश्वर, नाशिक
मराठी दूरचित्रवाणी वाहिन्या पुढीलप्रमाणे - दूरदर्शन-सह्याद्री, झी मराठी,ई टीवी मराठी स्टार माझा , मी मराठी , झी टॉकीज, झी २४ तास,आयबीएन-लोकमत आणि साम मराठी. मागील काही वर्षांपासून मराठी वाहिन्यांनी लोकप्रियता मिळवली असून बहुतेक वाहिन्या २४ तास सुरू असतात. परदेशस्थ मराठी माणसेदेखील यांचा आस्वाद घेतात.
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती भागानुसार बदलते. कोकणात भात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी आणि बाजरी जास्त खाल्ली जाते. सर्व प्रकारच्या डाळी, कांदे, बटाटे, टॉमेटो, मिरची, लसूण व आले हे पदार्थ मराठी जेवणात सर्रास वापरले जातात. सामिष अन्न अनेक जणांना आवडते.
गणेशोत्सव
मराठी स्त्रियांचा पारंपारिक वेष नऊवारी साडी तर पुरुषांचा धोतर/पायजमा आणि सदरा असा आहे. परंतु शहरी भागात आधुनिक पेहराव केले जातात.
भारतातील इतर प्रांतांप्रमाणेच क्रिकेट हा खेळ येथेही लोकप्रिय आहे. कबड्डी सुद्धा खेळली जाते. लहान मुलांत विटी-दांडू, पकडा-पकडी हे खेळ लोकप्रिय आहेत.
दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमीगणेशोत्सव हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत. यांपैकी गणेशोत्सव सर्वांत मोठा व लोकप्रिय सण आहे जो आता देशभर साजरा केला जातो. दहा दिवस साजरा होणारा हा सण बुद्धी व विद्येचे दैवत असणार्‍या गणपतीचा आहे. त्याचबरोबर शिव-जयंती, वटपौर्णिमा, मकरसंक्रांती, दसरा इ. सण देखील साजरे केले जातात.
स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारनांची व चळवळ व स्त्री शिक्षणाची चळवळ महाराष्ट्रातुनच सुरु झाली. तत्कालीन समाजसुधारकांचे अग्रणी महात्मा ज्योतीबा फुले हे होते.
महात्मा ज्योतीबा फुले

हवामान

राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो. मार्चपासून सुरू असणारा उन्हाळा मे महिन्यात संपतो. जूनच्या आरंभापासून मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. पावसाळ्यात जमिनीवर पसरलेली हिरवळ त्यानंतर येणाऱ्या सौम्य हिवाळ्यात देखील टिकून राहते. मात्र एकदा का उन्हाळा सुरू झाला की हिरवळ वाळून जाते व सर्वत्र रूक्षपणा पसरतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणारा मोसमी पाऊस जोराचा असतो आणि घाटमाध्यावर त्याचे प्रमाण ४०० सें.मी. वर जाऊन पोहोचते. सह्यादीच्या पश्चिमेकडील, वाऱ्यांच्या दिशेत येणाऱ्या, कोकण भागात मुसळधार पाऊस पडतो. मात्र उत्तरेकडे त्याचे प्रमाण कमी होत जाते. सह्याद्रीच्या पुर्वेकडे पर्जन्यछायेच्या प्रदेश असून मावळ भागातून हळूहळू पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी होते व महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागात ते ७० से.मी. इतके खाली येते. सोलापूरअहमदनगर हे जिल्हे कोरड्या भागाच्या मर्मस्थानीच आहेत. मोसमी ऋतुच्या उत्तरकाळात पूर्वेकडील मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचे प्रमाण थोडेसे वाढते. मराठवाड्यात थोडासा वळवाचा पाऊस पडतो तर विदर्भात बंगालच्या उपसागरावरून येणारी मोसमी वाऱ्यांची शाखादेखील थोडासा पाऊस देते.

वाहतूक व्यवस्था

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग
भारतीय रेल्वेचे जाळे राज्यभर आहे व लांबच्या प्रवासाकरीता रेल्वे हे सोयीचे साधन आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक भागांना मध्य रेल्वे सेवा पुरवते. कोकण भागात कोकण रेल्वे तर इतर काही भागांना पश्चिम रेल्वे सेवा देते. सध्या मुंबई शहरात मोनोरेल व पुणे शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एस.टी) सेवा बहुतेक शहर व खेड्यात उपलब्ध असते. एस.टी.चे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. विशेषत: ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत. अनेक शहरात एस.टी. बरोबरच खाजगी गाड्यादेखील सेवा पुरवतात.
महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतातील सर्वांत मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईत आहे. नागपूरपुणे विमानतळांवरुन देशांतर्गत तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील होतात.औरंगाबाद, रत्‍नागिरी, कोल्हापूरसोलापूर येथेही राष्ट्रीय विमानतळ आहेत. मुंबईतल्या बंदरांपासून कोकण किनारपट्टीवरील इतर बंदरात फेरी-सेवा (समुद्रावरून वाहतूक) होत असते. शहरी भागात ३ आसनी रिक्षा तर उपनगरात सहाआसनी रिक्षा लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात महामार्गांचे मोठे जाळे आहे. मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वांत पहिला टोलमार्ग आहे. मुंबई-नागपूर दरम्यानच्या या प्रतीच्या मार्गाचे काम सुरू आहे. मुंबई, न्हावा-शेवा व रत्‍नागिरी ही महाराष्ट्रातील ३ मोठी बंदरे आहेत.

मुख्य शहरे

  • मुंबई - मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मुंबईत व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने भारताच्या विविध भागांतून लोक रोजगारासाठी येथे मोठ्या संख्येने येतात.
  • पुणे - शिवाजीपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. शिक्षण आणि संशोधनसंस्था येथे मोठ्या संख्येने आहेत. पुणे शहर परिसरात आधुनिक उद्योगव्यवसाय मोठ्या संख्येने उभे राहिले आहेत. विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतातील आघाडीचे शहर असा लौकिक पुण्याने मिळवला आहे.
  • नागपूर - विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर असलेले नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते.
  • औरंगाबाद - महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असा लौकिक असलेल्या या शहरात आणि परिसरात अनेक जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ येथे आहे. वाहनांचे सुटे भाग आणि पेयनिर्मितीच्या कारखान्यांची संख्या औरंगाबाद परिसरात मोठी आहे. मराठवाडा विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे.
  • नाशिक - हे उत्तर महाराष्ट्रातील ऐतिहासिक व औद्योगिक शहर आहे. दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या मुहूर्तावर गोदावरी नदीत स्नान करणे पवित्र मानले जाते. त्यासाठी हिंदू साधू आणि भाविक मोठ्या संख्येने येथे येतात.
  • कोल्हापूर- शिवाजीच्या काळापासून व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर अंबाबाईच्या महालक्ष्मी मंदिरासाठी हे प्रसिद्ध आहे.
  • सोलापूर- महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील एक प्रमुख शहर. एके काळी कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. येथील सिद्धेश्वराचे मंदिरही प्रसिद्ध.

पर्यटन

या विषयावर विस्तृत लेख पहा - महाराष्ट्र पर्यटन
महाराष्ट्र हा भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक अश्या सर्व दृष्टीने संपन्न आहे. प्रवासासाठी चांगले लोहमार्ग, पक्के रस्ते, चांगली आणि स्वस्त क्षुधाशांतिगृहे, धर्मशाळा यांची येथे रेलचेल आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाने महाराष्ट्रातील पर्यटनव्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले असून डेक्कन ओडिसी नावाची विशेष रेल्वे गाडी सुरू केली आहे. अजिंठा लेणी, मुंबई, थंड हवेची ठिकाणे, किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसून येतात.

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...