Pages

विशेष

कोणतीही वस्तू चांगली वा वाईट नसते. आपले विचार तिला तसे रुप देतात.

कोणत्याही गोष्टीकडे वरवर पाहू नये. त्या मागची पार्श्वभूमी जाणूनच निर्णय घ्यावा.

कोणाशी शत्रुत्व किंवा वैर करणे म्हणजे आपला विकास थांबवून ठेवणे होय.

क्रांतीचा जन्म करुणामय अंतःकरणात होत असतो.

क्रोध हा असा अग्नी आहे की, ज्या व्यक्तीमध्ये तो उत्पन्न होतो, त्या व्यक्तीलाच तो जाळून टाकतो.

क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम उपाय नाही.

गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा येणा-या संधीचे स्वागत करा.

चांगुलपणा जाणायलासुद्धा अंगी चांगुलपणा असावा लागतो.

जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाक कराल तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवेल.

जितक्या अपेक्षा कमी, त्या प्रमाणात मनाला शांतता अधिक लाभते.

जीवन म्हणजे आव्हाने, साहस आणि पात्रतेची खरी कसोटीच होय.

जीवन हा संघर्ष असला तरी त्याला धैर्याने तोंड देण्यातच पुरुषार्थ आहे.

जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा संगम आहे.

जीवन ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे.

जीवनाचे मुखवटे प्रत्येक पिढीत बदलतात, पण त्यांचा आत्मा एकच असतो.

जीवनातल्या नित्यक्रमांचे जेव्हा उत्सव होतात, तेव्हा आयुष्य ही आनंदयात्रा होते.

जुलमाने विचार मरत नाहीत, तर ते अधिक सुदृढ होतात.

जेथे बुद्धीचे क्षेत्र संपते, तेथे श्रद्धेचे क्षेत्र सुरु होते.

जो चांगल्या वृक्षांचा आश्रय घेतो, त्याला चांगली छाया लाभते.

जो नेहमी सत्याच्या मार्गाने चालतो, तो कधीही मागे पडत नाही.

ज्ञान दाखविण्यापेक्षा अज्ञान लपविणे कठीण असते.